दोघांमध्ये तिसरी व्यक्ती नको…

नको ती उठाठेव आणि वाद दोघांमध्ये!

दोघांमध्ये तिसरी व्यक्ती नको...

दोघांमध्ये बहुदा वाद कोना तिसऱ्या व्यक्तीमुळेच जास्त होतात. त्या व्यक्तीची मतं, त्याने दिलेल्या वक्तवावर चर्चा होते. त्या चर्चेचं रूपांतर मतभेदात होतं आणि अंततः ते वादामध्ये बदलतं. हे वाद कधी कधी नमतात. पण बहुतांश वेळेला ते भयाण रूप ही घेतात. या अशाच काहीश्या गोष्टी टोकाच्या निर्णयावर वजन देतात. जे वजन अर्थात ओझं आपल्याला झेपत नाही.

कालच एका चित्रपटात पाहिलं. त्या बोर्ड वर असं लिहिलं होतं, “Two is company, Three is crowd…” जेव्हा गर्दी वाढते आपला गोंधळ उडतो. त्याच गोंधळात आपण नको नको ते करून बसतो. निर्णय चुकवतो, स्वतःच्या विचारांना मागे ठेवून दुसऱ्यांच्या बोलण्याला प्राधान्य देतो. रिकामं आणि कमी विचारांच्या मनात उगा गर्दी भरून सत्यानाश करून टाकतो.

काही वेळेला आपल्याला देखील असं वाटतं की आपण कोणी तिसरी व्यक्ती आहोत. त्या दोघांच्या मध्यात पडून उगाचच आपली व्यक्तिगत किंमत कमी करून टाकतो. ती कमी अशी होते की समोरचा तसा वागू लागतो. जाणवून देतो आपल्याला की तू या क्षणाला तरी इथे नकोय आम्हाला. म्हणूनच आपण असो किंवा इतर कोणी दोघांमध्ये तिसरी व्यक्ती नकोच.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information, click on the following link??

Related Posts