का ती गोष्ट सतत पुढ्यात!

का असावं असं?

का असावं असं? मला कळत नाही. दुःखाचा एक क्षण सुखाची असणारी संपूर्ण साखळी मोडून काढतो. अगदी त्याच्या डाव्या हातचा खेळ असल्यासारखं. आणि ते विरझण टाकतं जसं की, ते त्याचं मनपसंत काम आहे.

पण तसं करूनही त्याच मन काही भरत नाही बरं! तो अजून वाटा शोधत असतो. आणखी काय मिळेल त्याला जेणेकरून अजून अडथळे निर्माण होतील सुखी आयुष्यात. पण ह्या वाटेवर चालताना इतकं मात्र नक्की आहे साऱ्या गोष्टी क्षणभंगूरच असतात. ज्या गोष्टी आयुष्यात बरंच काही शिकवून जातात. त्या गोष्टींना आपण आढावा देत जातो नकळत का असेना. आणि स्वतःला त्या घोळक्यात अडकवतो. ज्याचा फारसा उपयोग होत नाही.

हे आपल्या अंगाशी असं काही येतं की आपली बोबडी वळते. ते ही आपल्या परिस्थिती सकट. पुढे जाऊन अजून धमाल असते आपल्याच लोकांशी भांडण-मतभेदही सोबतीला. वाद असतातच त्याच बरोबर आणि तेही ओळखीच्या माणसांशीच त्याचा काही थांगपत्ता लागत नाही. का असं आणि किती दिवस असं चालू असणार ते कोणास ठाऊक.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts