नाही म्हणेल तरी कोण…

चीड येत नाही का?

सुधारणा नाही अजून तरी वागण्यात कोणाच्या. काय कारण असावं बरं यामागचं कोणी सांगेल का मला! मनाविपरीत वागतात नेहमी, जाणून-बुजून तर तसं करत नसतील ना. याचा शोध लागेल तरी कसा? याची शोधाशोध करावी तरी कशी?

समंज्यस पणाने जर काही कोणी सांगत असेल ते फक्त तात्पुरतं ऐकून सोडून द्यायचं. आणि पुन्हा त्याच मार्गाकडे चालू पडायचं. म्हणजे समोरच्याला दर्शवायचं आमच्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात. आणि आमचंच आम्ही ऐकून तुम्हाला महत्व कमी देणार. कारण तुम्ही फक्त दाखवण्यापुरते त्यांचे जवळचे असता. उर्वरित वेळेला तुम्ही कोणी नाही फक्त वेळ साधण्यासाठी असलेलं साधन आहात.

चीड येत नाही का? असा प्रश्न मनात येतो. कित्येक वेळेला हा एकच प्रश्न मनाच्या टेप रेकॉर्डर मध्ये आलेल्या नावडत्या गाण्यासारखा सुरु असतो. होते ना चिडचिड, भरपूर होते. पण नातं त्यांनी सोडून दिलं म्हणून आपणही आता तेच केलं तर जे आता नाही होत ते पुढे जाऊन नक्कीच होणार. याची शाश्वती त्या व्यक्ती कडून मिळतच असते. त्याच्या केलेल्या कुरघोडी (नाही करणार मी पुन्हा हे) ह्यांतच सारं समजून येत.

पण त्यालाही मर्यादा असतात आपल्याला माहित असतं समोरचा आपला फायदा घेतो तरीही आपण तिथेच राहावं. ह्यात कोणत्या शहाणपणाचं बाळकडू पित असतील, हे आपल्याला तेच सांगू शकणार.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts