गृहीत धरलेल्या गोष्टी आणि माणसं…

गृहीत गोष्टी धरतात की वागणूक?

गृहीत धरलेल्या गोष्टी आणि माणसं...

गृहीत गोष्टी असुदे किंवा माणसं, मुळात दोघांना गृहीत धरणं चुकीचं आहे. पण त्याला काही पर्याय नसतो, ना माणसांना, ना स्वभावाला, ना त्या गोष्टींना. आपण इतके मग्न असतो स्वतःच्या गुंतागुंतीत की आपल्याला हव्या किंवा गरजू असलेल्या गोष्टींना वेळ देता येत नाही. मग जे नको आहे ते सतत पुढे येत राहतं. ते सगळं अचानक आल्यामुळे आपण वेळेला गृहीत धरतो आणि सारं काही विस्कटून टाकतो.

आपण केलेली आखणी, ठरवलेल्या गोष्टी, फिरायला जाण्याच्या दिवसांसकट जवळ जवळ सगळंच. कारण काही जण ह्या वेळेच्या मैत्रीत असतात. त्यांना माहित असतं की ही योग्य वेळ आहे, आता आपण ह्याचा फायदा घेऊ. समोरचा नकार पण देणार नाही आणि त्यामुळे हवं ते, हवं तसं करून घेता येईल. गोड बोलून अथवा भावनिक दृष्ट्या! त्या वागण्याच्या सवयीची सोबत आता सुटता सुटत नाही. ह्याची कल्पना त्यांना चांगलीच आलेली असते.

ह्यात चूक आणि बरोबरचा प्रश्नच येत नाही. जिथे तुमची गरज असते तिथे तुम्हाला असावच लागतं. मग ते तुमच्या मनाविरुद्ध असेल किंवा मग नियती विरुद्ध. कधी कधी आपण स्वतःहून आपल्याला माहित असून काही गोष्टी जाणीवपूर्वक करतो. पुढे काय होईल काय नाही याचा विचार न करता कारण तो क्षण सध्याला महत्वाचा असतो. बाकी पुढचं काहीही नाही. या हिशोबाने आपण कित्येक गोष्टी करून टाकतो. त्याचबरोबर अश्याच सवयी लावून घेतो.

याला अंत तर नाही. पण गोष्टी क्षणिकच असतात. याची कल्पना जेव्हा मनात घर करून जाईल आणि या वास्तव्याचा स्वीकार आपण जेव्हा करू तेव्हा आपोआपच आपण यातून बाहेर यायला शिकत जाऊ. अर्थात सगळ्याच गोष्टी, सवयी लगेच बदलता येत नाहीत. माणसं सुद्धा त्याचाच भाग आहेत. ना मैत्री, ना प्रेम, ना आपले आई-वडील. कारण एकदा का त्यांच्यावर नावाचा शिक्कमोर्तब झाला की मग पुढे बोलायला काही अर्थ राहत नाही.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information, click on the following link??

Related Posts