कधी कधी काही गोष्टी!

काही गोष्टी, ज्यांना आपण लांब ठेवलेलंच बरं…

कधी-कधी काही गोष्टी!

कधी कधी निवडक गोष्टी खूप जास्त त्रासदायक असतात. ज्याचं आपल्या जवळ असणंच मुळात घातक असतं. पण कोण जाणे का? आपण त्या सोडत नाही. हे जाणून देखील की, याचा आपल्याला सगळ्यात जास्त मनस्ताप होतो.

कधी वेळ येतेच अशी की, आपल्याला मार्ग मिळत नाही त्या गोष्टींतून निघायला. अथवा त्या व्यक्तींमधून निघायला. कोण जाणे का पण ते जमत नाही. मुळात शक्य होत असतं पण आपण असमर्थवान ठरतो. यावेळी अश्रू येणं स्वाभाविकच आहे. रडणं ही नैसर्गिक गोष्ट असली तरी सर्वांवर ह्याचा उपयोग होतो असं नाही ना! काही अपवाद असतात माझ्यासारखे.

तात्पुरतं, क्षणिक रडणं ठीक आहे. पण रडण्याने झालेल्या गोष्टी बदलता येत नाहीत. योग्य वेळीच या रडण्याला त्या गोष्टींपासून किंवा त्या व्यक्तीपासून वेगळं जर करत नाही. तर मात्र जेव्हा-जेव्हा ही गोष्ट आठवेल तेव्हा ती व्यक्ती आठवणारच. डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे सावरणं जरी कठीण असलं तरी ते करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरतं, इतकं लक्षात असुदे…

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts