कल्लुर्ती पंजुर्ली परंपरा – मूळ अर्थ आणि पारंपारिक कथा

कल्लुर्ती पंजुर्ली परंपरा कशी उदयास आली आणि त्यामागची पारंपारिक कारणे काय?

‘कल्लुर्ती पंजुर्ली’ ह्यातील ‘पंजुर्ली’ हा शब्द पारंपारिक दृष्ट्या ‘पंजिडा कुर्ले’ या शब्दापासून आला असावा ज्याचा अर्थ तुळू भाषेतील ‘तरुण रानडुक्कर’ असा होतो.”

कल्लुर्ती पंजुर्ली

आपण ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हा चित्रपट पाहिला असाल. कांतारा चित्रपटाचे मूळ असणारी पंजुर्ली परंपरा हे आपल्या भारतीय अतिप्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवते. असे मानले जाते की पंजुर्ली हे तुलुनाडूमधील सर्वात प्राचीन दैवांपैकी एक आहे. त्याचे असे वर्णन केले आहे की, जेव्हा पिकांचा जन्म झाला त्याच काळात पंजुर्ली पृथ्वीवर आली असावी. हे मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान घडले असावे, जो जंगल निवासातून शेतीकडे वळू लागलेला. जेव्हा मानवाने शेतीमध्ये गुंतून पिके घेण्यास सुरुवात केली तेव्हा हे शक्य होऊ शकते कारण रानडुक्कर स्वतःचे पोट भरण्यासाठी माणसाने लागवड केलेल्या पिकांची नासाडी करत असत.

मानवाने त्याला कदाचित अलौकिक आत्म्याचा शाप म्हणून पाहिले असेल जो रानडुकराच्या रूपात आला आणि त्याने हा सर्व विनाश घडवून आणला. तेव्हापासून रानडुकराची पूजा करण्यात आली असावी. संपूर्ण तुलुनाडूमध्ये पंजुर्लीची वराह म्हणून पूजा केली जाते.

कल्लुर्ती पंजुर्ली

आजही पंजुर्ली दैवाच्या कोल्यादरम्यान “बारणे कोरपुणी” नावाच्या प्रथेचे पालन करतात ज्यामध्ये भात/तांदूळ विणलेल्या बांबूच्या पट्ट्यांपासून बनवलेल्या थाळीवर ठेवला जातो आणि एका तुटलेल्या नारळावर दोन दिवे लावले जातात.

कोला/नेमा दरम्यान मुगा थकल्यावर एक व्यक्ती दैवासमोर उभी राहते आणि पंजुर्लीला तीन वेळा तांदूळ खायला घालते. यावरून असे दिसून येते की आपले पूर्वज त्यांच्या लागवडीच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी पंजुर्ली दैवाची पूजा करत होते आणि नंतर दैवांना तांदूळ अर्पण करून त्यांच्या पिकांचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानत होते.

कल्लुर्ती पंजुर्ली

मुगा – मुगा हा मुळात दैवाचा मुखवटा आहे. जे पितळ, चांदी किंवा सोन्याचे बनलेले असते आणि पारंपारिकपणे सुपारीच्या पानापासून बनवले जाते. त्यांच्या कथांवर अवलंबून प्रत्येक दैवाचा स्वतःचा मुगा असतो. कोलाच्या वेळी ते दैवाच्या मस्तकावर किंवा चेहऱ्यावर बांधले जाते आणि उर्वरित दिवस माने-मंचावर त्याची पूजा केली जाते.

पद-दानानुसार पंजुर्लीची कथा

पद-दान - पद-दान ही मुळात कोला/नेमादरम्यान तोंडी गायलेली कविता आहे. जे विशिष्ट दैवांची कथा सांगते. हे सहसा थेंबरे नावाच्या वाद्याने गायले जाते”

रानडुकराची पाच अर्भकं (मुलं) होती ज्यात एकाला बाकीच्यांपासून वेगळे करण्यात आले. देवी पार्वती या पिलाचे निरीक्षण करते आणि तिला ते सुंदर दिसते. ती त्या विभक्त नर पिलाला सोबत घेऊन कैलासाला जाते. ती या पिलाची काळजी घेऊ लागली. या पिलाची वाढ होऊन दात वाढू लागतात. दातांना खाज सुटणे आणि जळजळ झाल्याने डुक्कर पिकांची नासाडी करू लागले. यावर भगवान शिव रागावले आणि ते या डुक्कराला मारणार होते. देवी पार्वती असे करण्यापासून त्यांना त्वरित थांबवते. भगवान शिव त्याला कैलासात जास्त काळ न राहण्याची आज्ञा देतात आणि लोकांना वाईटांपासून वाचवण्यासाठी दैवी आत्मा म्हणून पृथ्वीवर जाण्याचा शाप देतात.

तेव्हापासून पंजुर्ली पृथ्वीवर आली आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात पूजली गेली. पंजुर्लीचे ठिकाण आणि इतर आत्म्यांच्या सहभागावर अवलंबून नाव देखील बदलले. उदाहरणार्थ : अन्नप्पा-पंजुर्ली, कुप्पेट्ट-पंजुर्ली, आलेरा-पंजुर्ली, वरनाळा-पंजुर्ली, तेल्लार-पंजुर्ली इ. फक्त नावापुरतेच नाही तर पंजुर्लीची पूजा करण्याच्या विविध पद्धती आहेत. काही ठिकाणी पंजुर्ली माणसाच्या रूपात तर काही ठिकाणी ती अजूनही रानडुकराच्या रूपात आहे. आपल्या पूर्वजांनी त्याची पूजा कशी केली यावर ते अवलंबून आहे.

कल्लुर्ती- कल्लकुडांनी अनेक प्रकारे आपली उपस्थिती दर्शविली आणि लोकांना त्यांची पूजा करायला लावली. वाटेत मंगळूर येथील बंटवाल तुळुकजवळ बडकट्टे रायरा चावडी नावाच्या ठिकाणी कल्लुर्ती पंजुर्ली दैवाला भेटतात. कल्लुर्ती-पंजुर्ली या निष्कर्षापर्यंत पोहोचले की यापुढे त्यांना संपूर्ण तुलुनाडूमध्ये “थागे- थांगडी सत्योलू” म्हणजेच “भाऊ-बहीण असलेले दैव” म्हणून पूजले पाहिजे. तेव्हापासून, दक्षिणेकडील तुलुनाडूमध्ये त्यांची कल्लूर्ती पंजुर्ली म्हणून पूजा केली जाते आणि उत्तरेकडील तुलुनाडूमध्ये त्यांची पूजा वरथे-पंजुर्ली म्हणून केली जाते. तुलुनाडूमध्ये असे कोणतेही कुटुंब नाही जे कल्लुर्ती पंजुर्लीची पूजा करत नाहीत. “संकंद समले पेधिंदा आपे” म्हणजे “मामासारखे पोषण आणि आईसारखे जन्म देणे”. मामा-मावशी मुलांमध्ये भेदभाव करत नाहीत, त्याचप्रमाणे कल्लूर्ती पंजुर्ली सर्व परिस्थितीत आपल्यासोबत राहतील, अशी पूर्वजांची धारणा होती. त्यांना फक्त दैव म्हणून पूजले जात नव्हते तर आपल्यापैकी एक म्हणूनही मानले जात होते.

कल्लुर्ती- पंजुर्ली हे कुटुंब प्रमुख मानले जातात. कुटुंबाला कोणतीही समस्या किंवा अडचणी भेडसावत असली तरी ती कल्लूर्ती- पंजुर्ली दैवाना कळवावी लागते. ते दर्शनादरम्यान किंवा कोलादरम्यान असू शकते. कल्लुर्ती- पंजुर्ली दैवाला कुटुंबाच्या न्यायाचा हक्क देण्यात आला आहे. जिथे सल्ला देण्याचे काम कल्लुर्ती दैव करतात आणि योग्य दिशा दाखवण्याचे काम पंजुर्ली दैव करतात.

या सगळ्या परंपरेतून आपले दैववर्धन किती सुंदर आहे हे दिसून येते. ह्या केवळ पाळण्याच्या प्रथा नसून त्या समजून घेण्याचा एक धडा आहेत. याच प्रथांमधून आपल्या पूर्वजांनी मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याची सुंदर रचना केली आहे.

@TeamUgtWorld




Write with us✍?

Greetings to Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us on our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts