शब्द कमी आणि भावना अनेक असणाऱ्या चारोळ्या…

मराठी चारोळ्या कित्येक प्रकारच्या असतात. ज्यात प्रेम, मैत्री, राग आणि बरेच भाव दडलेले असतात.

आपण जे क्षण अनुभवतो ते सगळ्यांना शब्दात मांडता येतात पण मोजक्याच शब्दात मांडणं म्हणजे चार ओळीत सगळं सांगणं हे फार कमी जण करतात.

अशाच मोजक्या शब्दांनी पण आयुष्यातल्या अनेक भावना दडलेल्या ह्या चारोळ्या आहेत. ह्या वाचून आपला वेळ नक्कीच छान जाईल…


UgtWorld

जाणीव हवी होती व्हायला

आता ती होत ही नाही म्हणा,

वेळ बदलली, मन बदललं

आता प्रेम राहील नाही बहुतेक पुन्हा… 

UgtWorld

प्रेम नसतं संपत मनात

फक्त त्याच वर्चस्व कमी होतं,

विरह, दुरावा, गैरसमज, अबोला

यानेच जे काय होतं ते होतं…

Related Posts

4 thoughts on “मराठी चारोळ्या

Comments are closed.