संगत तरी कितपत सोडू
काय असे कल, मनाला जपू
सगळ्यांनी पुरता फायदा घेतला
आता सोबत तरी कोणाला ठेऊ..
का इतकी परीक्षा पहावी
ज्याचा निकाल जीवघेणा असेल
कितीसा असा प्रयत्न करू मी
किती वेळा जीव वाचवावा लागेल…
फिरती गाडी आहे आयुष्याची
पकडावी लागेलच अस नाही.
कधी-कधी काही गाड्या
सोडून देण्यात च भलं या आयुष्यात ही..
राहतं मन, खेळतं हृदय
दोन्ही घातक च मनासाठी
काय? कोण? कधी? दगा करेल कोणावर
काही सांगता येत नाही.
पण प्रश्न असा येतो मानता
का? हे सगळं कशासाठी…
नको पुन्हा मला ती नाती-गोती
नको मला या साया उठाठेवी
जिये सहन नाही होत अस्तित्व तुझ
का जातोस अश्या ठिकाणी…
Nice
Thank you for your feedback.
Beautiful Words
Thank you so much Manoj…