कंटाळा येतो कधी-कधी समजावताना…

समजावताना, अफाट सहनशक्ती लागते!

आपण बहुतांश वेळेला काही ना काही घेऊन गुंतलेले असतो. मग ते आपल्या डोक्याचं टेन्शन असेल किंवा कोणा जवळच्या व्यक्तीचं. अर्थात असेच असलेल्या नातेसंबंधात सुद्धा असं पुढे येत राहतं. आपण मग विचार करू लागतो नेमकं करायचं काय सध्याच्या घडीला. कसं सोडवायचा प्रश्न जो आपल्या पुढ्यात आलेला आहे. समजावताना कितपत सहनशक्ती जाईल आणि किती नाही याचा अंदाज आपण घेणं विसरतो.

पण एका वेळेनंतर सगळंच विस्कटून जातं. सांगणाऱ्याचे शब्द संपतात तरी ही ऐकणारा काही समजून घेत नाही. त्याउलट असं होत कि जी गोष्ट आपण चुकीची पाहू शकतो, ती गोष्ट समोरची व्यक्ती चुकीची नाही पाहू शकत. कारण ती व्यक्ती त्यात इतकी गुंतलेली असते कि चूक बरोबर याचा काही थांगपत्ता लागत नाही. मग मतभेद तर होणारच ना! अंततः नात्यात दरी येते.

तीच तीच गोष्ट जर सारखी समोर येत असेल तर त्याला अर्थ च नाही. त्याला अर्थ या साठी नाही कारण त्या गोष्टी ची पुढची पाऊलवाट च नाही. तिथेच थारा करून राहिल्यामुळे अर्थातच चिडचिड होते. सांगणाऱ्याची सुद्धा आणि ऐकणाऱ्याची देखील. त्या पेक्षा काही गोष्टी करून तरी टाकाव्यात किंवा मग त्या सोडून तरी द्याव्यात. किमान थोडा वेळ का असेना जीवाला शांतता.

@UgtWorld

Related Posts

12 thoughts on “मराठी लघु-लेख

  1. Nowadays , there is no respect,no understanding ,no value of some Emotional people’s emotions.So, Emotional people getting frustate.
    Very well said UGT.

    1. Absolutely right Manoj, we appreciate your lovely concern. we hope we do take care of people’s emotions. Thanks for the feedback have a nice time ahead.

  2. Life Is Define By Bad Things & Good Things . But, Sometimes Most Bad Things Happens By Our Most Loving People.,And That Bad Things Are Always Grater Than Good Things, Same As Written By UGT.These Bad Things Makes PRISON To Our Good Things, Happiness ,Pease & Positivity.So,Let It Go(Bad things & Wrong People). N Go Ahead.
    Make A Relationship With God , Which Can Give Us Eternal Peace.
    Always Nice Subject Written By You UGT.???

Comments are closed.