बेचैन विचारांची मनाला साद!

मन झालंय बेचैन…

मन बेचैन झालंय, एकटसं पडलंय. त्याचबरोबर कुणाशी बोलायचं की नाही, याचा प्रश्न वेगळा पडतो मनाला. सतत अगदी तीन वेळा सतत यावं असंच मानत विचारांची गर्दी सुरु होते. त्या गर्दीला कमी करायला मार्ग मिळत नाही. त्याउलट गर्दी कशी वाढवावी यासाठी अधिक मार्ग तयार होतात. पण एक गोष्ट मनाने विसरलेली असते.

जेव्हा आपल्या भावनांच्या तिजोरीतून चावी हरवते, त्या क्षणी आपल्याकडे एक डुप्लिकेट चावी असतेच, पण ती कुठे आहे किंवा कुठे ठेवली आहे याचं भान राहत नाही. ते भान जरा बाजूला ठेवून आपण जराशी मेहनत घेतली तर आपण ती तिजोरी उघडून त्यातल्या त्रासक भावना काढून टाकू शकतो. त्या रिकाम्या जागेत गरज असलेल्या चांगल्या भावना पुन्हा साठवू शकतो. त्रासलेलं मन नेहमी चुकीच्या वाटेवर जातं.

आपल्या रोजच्या बोलण्यातल्या सवयीवरून किंवा झालेल्या बारीक बदलावातून ते जाणवतं. अगदी सहजपणे ते दिसतं. आपल्या मनावर कुणाच्या व्यर्थ बोलण्याचा ताण नाही पडू द्यायचा. जोवर आपण त्या व्यर्थात नसू. याचा अर्थ असा की, चूक असेल तरचं माफी मागावी. जर चूक नाही तर का उगाच शिक्षा आपल्या अंगावर घ्यावी.

एकांत प्रत्येकाला झेपतोच असं नाही आणि त्यासाठी प्रयत्न न केलेलाच बरा. कालांतराने ती सवय लागतेच.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld! Anybody who wants to write whatever his/her Heart wants to. They can now publish their content with us at our platform @Ugtworld. For more information click on the following link…

Related Posts