प्रत्येक वेळी स्पष्टीकरण कशाला हवंय!

काहीही फायदा नाही त्या स्पष्टीकरण देण्याला…

प्रत्येक वेळी स्पष्टीकरण कशाला हवंय!

गरज म्हणून हल्ली वाटत च नाही म्हणा स्पष्टीकरण देणं. त्याचा उपयोग च काय होतो. बरं जरी दिलं तरी तेवढ्यापुरतं ते थांबत नाही ना! पुन्हा कधी ना कधी तो विषय निघतोच. मग जे काही दिलं गेलेलं असेल ते पुन्हा एका चक्राप्रमाणे आपल्या पुढ्यात. काही गोष्टी संपल्या जात असतात पण त्यांना वाट देण्याऐवजी त्यांना बांध दिला जातो.

समजून घेऊया असं बोलणं आणि समजून घेणं फरक आहेच. पण तो फरक बहुदा सर्वांना समजत नसावा. अथवा कोणाला समजून घेण्यात रस नसावा. कारण त्यात त्यांच काही फायदेशीर काम होत नाही ना! मनाजोगता मानसन्मान मिळत नाही. त्यांना नात्यापेक्षा स्वार्थ जास्त महत्वाचा वाटतो.

उगाच आपला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. ज्यांना कदर आहे गोष्टींची, माणसांची त्यांना कोणत्याही गोष्टींनी फरक पडत नाही. जर आपलं चुकत असेल तर माफी मागावी, कमी पणा घेतल्याने आपलं काहीही जात नाही. पण योग्य त्याच ठिकाणी नको तिथे घेऊन ही फायदा नाही. स्पष्टीकरण देणं न देणं आपल्या आणि त्या वेळी त्या परिस्थिती वर नक्कीच निर्भर असतं.

@UgtWorld




Write with us✍?

Greetings for Everyone from TeamUgtWorld!Anybody who wants to write whatever his/her Heart wants to can now publish their content with us at our platform @Ugtworld.For more information click on the following link??

Related Posts